महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ३२,००० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर! प्रति हेक्टरी मिळणार इतकी मदत nuksan bharpie

nuksan bharpie: अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतीत झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर, महाराष्ट्र सरकारने पीडित शेतकरी आणि नागरिकांसाठी सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक मदत पॅकेज जाहीर केले आहे. पिकांचे, घरांचे, जनावरांचे आणि जमिनीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने जवळपास ₹३२,००० कोटी रुपयांचे पॅकेज निश्चित केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

३२,००० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर!

प्रति हेक्टरी मिळणार इतकी मदत

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, शेतकऱ्याला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी NDRF च्या निकषांपेक्षाही जास्त मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक मुलगी असेल तर मिळणार 50 हजार, 2 मुली असतील तर 25 हजार रुपये, असा करा अर्ज Majhi Kanya Bhagyashree 

ओला दुष्काळ जाहीर व इतर सवलती

शेतकऱ्यांची सातत्याने ‘ओला दुष्काळ जाहीर करा’ ही मागणी होती. त्यानुसार सरकारने या कालावधीला ‘ओला दुष्काळ’ किंवा ‘ओल्या टंचाईचा काळ’ समजून त्यासंबंधीच्या सर्व उपाययोजना लागू केल्या आहेत:

  • महसूल सूट: जमीन महसुलात सूट.
  • कर्ज पुनर्गठन: शेती कर्जाचे पुनर्गठन.
  • वसूली स्थगिती: शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती.
  • परीक्षा शुल्क माफ: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
  • वीज जोडणी: शेतीच्या वीज पंपाची वीज जोडणी अबाधित राहील आणि नुकसानीची भरपाई मिळेल.

सरपंच उपसरपंच यांच्या पगारांमध्ये भक्कम वाढ, आता मिळणार तब्बल “एवढा” पगार Sarpanch salary in maharashtra 

जमीन खरडून गेल्याची भरपाई (सर्वात मोठी मदत)

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली असून, तिथे रबीची पेरणी करणेही शक्य नाही. ही एक गंभीर समस्या असल्याने सरकारने यावर अभूतपूर्व निर्णय घेतला आहे:

  • भरपाई: खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी ₹४७,००० रोख भरपाई (कॅश कंपेन्सशन) दिली जाईल.
  • नरेगा (NREGA) द्वारे मदत: याच जमिनीच्या पुनर्बांधणीसाठी नरेगाच्या माध्यमातून ₹३ लाख रुपये हेक्टरी मदत केली जाईल.
  • एकूण मदत: याचा अर्थ खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जवळपास साडेतीन लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील.

ऑक्टोबर उजाडला, लाडकीला सप्टेंबर चे 1500 कधी येणार, संभाव्य तारीख समोर Ladki Bahin septembar instalment 

इतर महत्त्वाची मदत आणि अनुदाने

या पॅकेजमध्ये पूरग्रस्त नागरिक, दुकानदार आणि जनावरांसाठीही मोठी आर्थिक तरतूद आहे:

मदतीचा प्रकार तपशील आणि रक्कम
तात्काळ रोख मदत ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांना तातडीची मदत म्हणून ₹१०,०००
पूर्णतः नष्ट झालेले घर नव्याने घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत नवीन घर समजून पूर्ण मदत.
डोंगरी भाग डोंगरी भागातील घरांना अतिरिक्त ₹१०,००० ची मदत.
झोपड्या / अंशतः पडझड अंशतः पडझड झालेल्या घरांना/झोपड्यांना नियमानुसार मदत.
विहिरींची दुरुस्ती गाळ साचलेल्या/नुकसान झालेल्या विहिरींसाठी ₹७०,००० प्रति विहीर (NDRF मध्ये नियम नसतानाही विशेष बाब म्हणून).
दुधाळ जनावरे प्रति जनावर ₹३७,५०० पर्यंत मदत. तीन जनावरांची मर्यादा काढून टाकली.
ओढकाम करणारी जनावरे प्रति जनावर ₹३२,००० पर्यंत मदत.
कुकुटपालन ₹१०० प्रति कोंबडी प्रमाणे नुकसानीची भरपाई.
दुकानदार नुकसान झालेल्या दुकानदारांना ₹५०,००० पर्यंत मदत.
पायाभूत सुविधा ग्रामीण भागातील इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीसाठी ₹२,००० कोटी उपलब्ध करून देणार.

अंतिम निर्णय आणि अंमलबजावणी

  • एकूण पॅकेज: या सर्व बाबींचा एकत्रित अंदाज घेतल्यास हे पॅकेज सुमारे ₹३२,००० कोटींपर्यंत पोहोचले आहे.
  • उद्देश: यातील जास्तीत जास्त निधी (विशेषतः क्रॉप कंपेन्सशन) शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
  • इतिहास: केवळ पीक नुकसान भरपाईसाठी ₹१८,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम देणे, हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment