पात्रता आणि अनुदानाची प्रक्रिया

पात्रता आणि अनुदानाची प्रक्रिया

हे अनुदान फक्त अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आणि शासनाच्या निश्चित केलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांसाठीच आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टी अनुदान मिळाले आहे, त्यांनाच पुढे हे रबी अनुदान म्हणून वितरित केले जाईल. जर आपले नुकसान होऊनही आपले नाव यादीत नसेल, तर संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पंचनामा आणि कागदपत्रांच्या आधारे त्वरित पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

अनुदानाचे वितरण पहिल्या टप्प्यात फार्मर आयडी (Farmer ID) च्या आधारे विना केवायसी (e-KYC) थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यांवर केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत किंवा सामायिक खातेधारक आहेत, त्यांचे पुढे केवायसी करून आणि सहमतीचे बंधपत्र (Bond) सादर करून पैसे वितरित केले जातील.