डिसेंबरअखेरच मिळणार दिलासा
राज्यभरातील महसूल मंडळांमधून पीककापणी प्रयोगांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. कृषी विभागाचे अधिकारी सांगतात की, सर्व प्रयोगांचे डेटा पूर्णपणे मिळाल्यानंतरच विमा कंपन्या अंतिम नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत प्रत्यक्षात डिसेंबर अखेरच मिळेल.